Posts

श्वेतप्रदर (व्हाईट डिसचार्ज)

रसिका ! २५ वर्षांची असेल. लग्नाकरिता घरचे स्थळे पहात होती. देखणी, सुदृढ बांध्याची. २८ वर्षांच्या सुरजने तिला पसंती दिली. सुरज अगदी वेल सेटल्ड व्यावसायिक होता. त्याचे कपड्यांचे दुकान मस्त चालायचे. साखरपुडा झाला. लग्नाची तारिख ६-७ महिन्यानंतरची निघाली. सगऴी धावपळ सुरु होती. प्रत्येक दिवस काही ना काही खरेदित जायचा. आणि खरेदिला गेले कि काही ना काहीतरी खास खाणे व्हायचेच..कधी पाणीपुरी कधी मिसळपाव तर कधी मसाला पुरी. दिवस आनंदात जात होते. आणि एक दिवस अचानक रसिकाला ताप आला, थंडी वाजून डोकेही दुखू लागले. तोंडाला चव नव्हती आणि थोडी मळमळही होवू लागली. शेजारिच डॉक्टरकाकू राहात होत्या..रसिका त्यांच्याकडे गेली, त्यांनी तपासणी केली..काही प्रश्नही विचारले.. त्यांच्या काही लक्षातही आले. त्यांनी विचारले ," तुला काही व्हाईट डिसचार्ज होतोय का?" रसिका म्हणाली, " हो..गेले १५ दिवस होतोय...अगदी पांढरे पाणी अंगावरुन जातंय " डॉक्टरकाकू म्हणाल्या, " त्यामुळेच तू निस्तेज, थकलेली दिसत आहेस...डोळ्याखाली ही काळी वर्तूळे दिसत आहेत". रसिका म्हणाली, "पण हे कसे झाले? मी तर नीट काळजी घे...

चिडचिडे जनार्दन आजोबा आनंदी झाले त्याची गोष्ट !!

जनार्दन आजोबा ! वय वर्ष ७२ .. पण उत्साह अगदी तरुणांना लाजवेल असा ! राजकिय चर्चा, सामाजिक विषयांवर खलबते, रोजच्या बातम्या पाहाणे, उत्तम वाचन, समवयस्कांशी चेष्टा-मस्करी ह्यात निवृत्तीचे छान जीवन जगत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो उत्साह बराच कमी झाला होता. तसा आजार कोणताही नाही, ना कौटुंबिक टेन्शन ! पण गेले काही दिवस ते थोेडेसे चिडचिडे झाले होते. काही बोलायचे म्हणले तर त्रासिकपणे उत्तर द्यायचे. एकदा शेजारचे विसूभाउ खास जनार्दन आजोबांना भेटायला आले. थोड्याफार गप्पा झाल्यावर मग आजोबा म्हणाले, "विसू...अरे आजकाल पचनशक्ती फारच कमजोर झालीय बघ... काहीही खाल्लं तरी पोटच साफ होत नाही. दिवसभर असे फुगल्यासारखे राहाते... त्यामुळे चैन पडत नाही बघ.. कोणाला सांगायचे तर ते लगेच चूर्ण देतात .. परवा कोणतेतरी चूर्ण घेतले तर एकदमच जुलाब झाल्यासारखे झाले आणि जीव घाबरल्यासारखा झाला रे ... काय करावं ते समजतच नाही बघ !" विसूभाउंना मग आजोबांच्या बदलत्या स्वभावाचे कारणच कळाले आणि ते हसतच म्हणाले,"अरे साधी तर गोष्ट आहे..मला आधी का नाही सांगायचे ... तुला माहितिये ना माझी सून आयुर्वेदिक डॉक्ट...

झिरो फिगरची क्रेझ !

ऋचा , १८-१९ वर्षांची, कॉलेजला जाणारी. त्यामुळे छान दिसणे, फॅशन, मित्र-मैत्रिणींबरोबर सतत तुलना इ. गोष्टी आल्याच. कोण कसं दिसतं ? किती लठ्ठ-बारिक, सौंदर्याच्या गप्पा, सिनेमाच्या गप्पा ह्या आल्याच. एकदा रिना (मैत्रीण) म्हणाली," करिनाची कशी झिरो फिगर आहे, तशी फिगर हवी." मग काय डाएटिंग ची तयारी सुरु. सकाळी काय खायचे ? दुपारी काय खायचे ? किती तासांनी खायचे ? व्यायाम किती ? ऋचा तर फक्त लिक्विड डाएट घ्यायला लागली. तेल, तुप, भात, बटाटा इ. पदार्थ बंद झाले. खाल्लेच तर उकडलेल्या भाज्या फक्त ! त्याही एकच वाटीभर. महिना झाला, तेच सुरु. मग काय, केस गळती, चक्कर येणे, चेहर्‍याचे तेज कमी होणे.मासिक पाळी तर काय आलीच नाही. त्वचा एकदम निस्तेज. कशातच लक्ष लागत नव्हतं तिचं. आईतर समजावून सांगून थकली.पण काही उपयोग नाही. मग एक दिवस कॉलेजहून येताना स्कूटीवरुन चक्कर येवून पडली, रस्त्यातच...मग सगळीकडे पळापळ! लोकांनीच हॉस्पिटल ला ऍडमिट केले. कॉलेजातून आई-बाबांना फोन. मग आईने डॉक्टरांना तिची सगळी खाण्या-पिण्याची सवय सांगितली. डॉक्टर खूप रागावल्या आणि काय खायचे ते सांगितले. तिला रोज सकाळी ८-१० भ...

चिंतातुर प्राण्याची गोष्ट !

राकेश .. एक चिंतातुर प्राणी ! पेपरला किंवा कोठेही "आजार व त्याची लक्षणे" वाचली कि ह्याला लगेच ती लक्षणे स्वत: मध्ये दिसू लागायची ! त्यात पुन्हा तो सॉफ्टवेअर ईंजिनियर ! म्हणजे दिवसभर टेन्शन, बसून काम आणि रात्री-बेरात्री क्लाएंट कॉल . त्यामुळे कधी ऍसिडीटिमुळ्य, गॅसेसमुळे छातीत दुखायचे. थोडेसे दुखले कि राकेशने गुगलवर लक्षणे टाकलीच म्हणुन समजा आणि गुगलमधून मग सर्च व्हायची ह्रृदयरोग वगैरे ची माहिती...राकेशचे टेन्शन अधिकच वाढायचे. बैठी दिनचर्या, तणावग्रस्त काम त्यामुळे स्थुलता पण निर्माण झाली होती. अगदी एक मजला चढला तरी राकेशला धाप लागायची.. मग लगेच गुगल सर्च व ग्रीन टि सारखे उपाय.. ५-६ वर्ष असेच सुरु राहिले आणि एक दिवस खुर्चीवर बसुन काम करता करता अचानक खूप घाम आला आणि चक्करही आली. मग डॉक्टरांनी शुगर टेस्ट करायला सांगितली. बी.पी. पण वाढलेलाच निघाला. अगदी ३४ व्या वर्षी शुगर निघाली. राकेशला अधिकच टेन्शन आले. पण डॉक्टरांनी मग त्याला दिनचर्या बदलायला सांगितली. सर्वात आधी मन चिंतामुक्त होणे आवश्यक होते. मेडिकली सांगायचे तर ऍड्रीनॅलीनचा स्त्राव उत्तम प्रमाणात होणे आवश्यक हो...

वातज विकार (संधीवात)

स्वाती ! संस्कारी, कर्तव्यदक्ष, सुगृहिणी ! सगळ्यांची काळजी घेणारी, स्वत:ला कितीहि त्रास झाला तरी काहिही कुरबुर न करता सगळ्यांसाठी झटणारी ! सुनीलबरोबर नुकतेच लग्न झालेले. संसार अगदी छान चालू होता. सासू-सासरे, सुनीलची आजी .. सगळे अगदी आनंदात होते. लग्नाला २ वर्षे होत आली, आजी अगदी मागे लागली .. लवकर बाळाचा विचार करा म्हणू लागली आणि अशातच स्वातीने गोड बातमी दिली. मग काय सगळा आनंदच ! सगळे अगदी स्वातीचे कौतुक करु लागले. काय हवंय-नकोय ते बघू लागले. स्वाती कुठे गप्प बसायला तयारच नाही. नुसती गडबड. कामे.. पट्पट् चालणे, बसणे-ऊठणे, अश्या गोष्टी. ती तब्येतीने चवळीची शेंग म्हणावी तशीच ! बघता बघता तो दिवस आलाच. आणि स्वातीने छान-गोंडस बाळाला जन्म दिला. मग काय आजी अगदी खुष ! घराला दिवा मिळाला म्हणू लागली. स्वाती, सुनील, सासु-सासरे सगळे मजेत. ८-१० दिवसातच स्वाती परत पहिल्यासारखी कामाला लागली. आजी,सास,आई  सगळे म्हणत "अग नको दगदग करु, पाण्यात काम करु, ओझी नको उचलू." . पण स्वाती कशाची ऐकतेय ! दिवसामागुन दिवस गेले. बाळ मोठे झाले. शाळेत जावू लागले. डिसेंबर महिना लागला. खूप थंडी वाढलेली. सकाळी रोज...

छोट्या पुर्वाची गोष्ट !

पूर्वा, छोटीशी दहा वर्षांची असेल, खूप हसरी, चिमुकली - गोंडस ! रोज शिस्तीने , कोणतीही तक्रार न करता अगदी हसरी खेळती. तिची सकाळ ६ वाजता सुरु व्हायची , पट्पट् आवरुन ७ वाजता स्कूल बस मध्ये बसणारी. पुर्वाची आई मेघा पण अगदी शिस्तीने सगळे आवरुन द्यायची. पुर्वा शाळेला गेल्यावर मग मेघाची व पुर्वाच्या बाबांची ऑफिसची तयारी सुरु व्हायची. दोघांनाही ८:३० वाजता ऑफिसला निघावे लागायचे. त्यामुळे रोज डब्यात काय द्यायचे हा मेघासमोरिल यक्षप्रश्न असायचा ! त्यामुळे डब्यात काय तर गडबडीमुळे पास्ता, नुडल्स, केक, सॅंडविच इ. जंक फुड !! सकाळी पुर्वा दुधही पित नसे. पुर्वाला दुध, दही, तुप इ. गोष्टी अजिबात आवडत नसत. मेघाला पण वेळ नसल्याने "जे काही पुर्वा पोटभर खाते, तेच खूप" असे वाटत असे. पण सोसायटी गार्डन मध्ये पुर्वा खेळत होती. पळता-पळता पाय कोठेतरी अडकून पडली. मग काय हाताला खूप सुज आली, हात खूप दुखायला लागला आणि ती रडतरडतच घरी आली. मेघाने तिला डॉक्टरकडे नेले. चेकअप केले तर काय "हाताला फ्रॅक्चर !". बागेत सहज पडल्यावरही हाताचे हाड फ्रॅक्चर !! डॉक्टरांनी प्लास्टर केले, आणि प्लास्टर करता करता गप्प...